Citizens Anger : गायब नगरसेवकांवर नागरिकांचा संताप — नांदेड शहरात ‘जागरूक नागरिकां’चे बॅनर चर्चेत
नांदेड| आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक ६ गणेश नगर परिसरात नागरिकांनी ‘जागरूक नागरिक’ या नावाने लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.


या बॅनरमधून नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मनपा निवडणूक २०१७ मध्ये निवडून आलेले आणि गेले ८ वर्षांपासून प्रभागातून गायब असलेले नगरसेवक आता इच्छुक उमेदवार म्हणून फिरू नयेत.”

तसेच नागरिकांनी आणखी काही ठोस मागण्या केल्या आहेत. कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेतली तरी मतदान करणार नाही. उमेदवार हा प्रभागात वास्तव्यास असलेला असावा. राजकीय पक्षांनी अशा निष्क्रिय उमेदवारांना उमेदवारी देऊ नये; अन्यथा परिणाम भोगावे लागतील.



या बॅनरवर शेवटी लिहिलेलं वाक्य नागरिकांच्या भावना अचूक व्यक्त करतं “एक है तो सेफ है… बढ़ेंगे तो कटेंगे!” निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची ही भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांतील जनतेच्या अपेक्षा आणि जागरूकतेचे दर्शन घडवते. अशा प्रकारचे बॅनर आता इतर प्रभागांमध्येही लावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




