victims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली. ग्रामपंचायती मार्फत पंचनामे करून ग्रामसेवक व सरपंचांनी गावनिहाय अहवाल पंचायत समितीकडे सादर केला. मात्र पंचायत समितीकडून सदरील याद्या व अहवाल तहसील कार्यालयास पोहोचलेच नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्तांचा अहवाल शासनाकडे सादर होऊ शकला नाही परिणामी अतिवृष्टीने बाधित झालेल्या लाभार्थीना मदत मिळण्यास विलंब झाला आहे. सोमवारी सरपंचांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे बाधित नागरिकांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.
तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार, पंचायत समितीने आठ दिवसांच्या कालावधीत अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक होते. तहसीलदार यांनी दोन ते तीन वेळा लेखी पत्राद्वारे याबाबत पत्रव्यवहार केला. उपविभागीय अध...
