Don’t drive the plow on farmers : किंमती गगनाला भिडल्या असतांना फुकटभाव जमीनी घेत शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नका -NNL
जालना।समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना या दुसऱ्या टप्प्याच्या द्रुतगती महामार्गाच्या जमीन अधिग्रहण अधिसूचनेला ३ वर्षे उलटली असली तरी संबंधित अधिकारी नुसती टोलवाटोलवी करीत असल्याने अद्याप जमीनीचे मुल्यांकन निश्चित झालेले नाही. शेतीवर अवलंबून असलेल्यांचा संसाराचा गाडा खोलवर रुतला असून, अनेकजण निराश झाले आहेत. त्यातून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्यास अवघड होईल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी..या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून प्रत्यक्ष बाजारभावानुसार मावेजा द्यावा, अशी मागणी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना या दुसऱ्या टप्याची अधिसुचना दि. ११ डिसेंबर २०२१ म्हणजे अडीच वर्षापुर्वी जाहीर झाल्यानंतर जालना तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांना दि. १७ डिसेंबर २०२१ म्हणजेच अधिसुचनेच्या ७ दिवसांनी संयुक्त ...
