Monday, May 25

Tag: Demand

हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

कृषी
हदगाव (गौतम वाठोरे) तालुक्यात व शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांवर अधिकृत माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाने केली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या हदगाव तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेले नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रस्ते कामे कोणत्या योजनेतून सुरू आहेत, अंदाजपत्रक किती आहे, कामाचा कालावधी किती आहे तसेच संबंधित कंत्राटदार कोण आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती फलक नसल्यामुळे कामाच्या दर्जा आणि निधीच्या वापराबाबत जनतेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण हो...
Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड शहर ते अर्धापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (ITMS) आणि सीसीटीव्ही पाळत यंत्रणा उभारावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अर्धापूर जवळील पार्डी मक्ता टोल प्लाझा ते नांदेड शहरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार या सुमारे ३३ किलोमीटरच्या मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक गंभीर अपघात घडल्याने जीवितहानीही झाली आहे. या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ...
To stop the harassment of farmers and beneficiary women : शेतकरी व लाभार्थी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी पोस्टातील उदिष्ट वाढण्याची मागणी -NNL

To stop the harassment of farmers and beneficiary women : शेतकरी व लाभार्थी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी पोस्टातील उदिष्ट वाढण्याची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर/शहापूर,गंगाधर मठवाले| शहापूर येथील पोस्टातून जनतेनी पैसे उचलण्यासाठी आलें असता दररोज केवळ एक लाख रुपये वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी रिकाम्या हाताने परत जात आहेत. हि बाबा लक्षात घेऊन शासनाने उद्दिष्ठ वाढून देऊन किमान दोन लाख रुपये रोख वाटप करण्याची सुविधा द्यावी अशी मागणी जनतेतुन केली जात आहे. देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर परिसरातील जवळपास दहा पंधरा गावांचे संपर्क असून, शासनाने वरच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अनूदान वाटप करण्याची योजना दाखल आहे. त्यातच लाडकि बहीण, योजना पंतप्रधान फसलं विमा योजना, मूख्यमंत्री योजना, निराधार लाभार्थी, श्रावण बाळं, पिक विमा, सोयाबीन व कापूस पिकाचे अनूदान असे वेगवेगळे प्रकारचे अनूदान शेतकरी जनतेला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आणि लाभार्थी जनतेची गर्दी सॅन उत्सवाच्या काळामुळे वाढली आहे. एक एक लाभार्थ्यांच्या खात्यावर वीस ते पंचव...
Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगांव l आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री आ. राजेश टोपे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतीच भेट घेऊन नायगांव विधानसभा मतदार संघातून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्ष श्रेष्ठींकडे निवडणुक उमेदवारींसाठी अर्ज सादर केला . नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी नायगाव तालुक्यातून २००७ मध्ये कॉंग्रेस कडून जि.प.लढवली तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नायगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत ह...
Demand immediate arrest of the accused : कापसी बु येथील मेंढपाळ यांना मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी – NNL

Demand immediate arrest of the accused : कापसी बु येथील मेंढपाळ यांना मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी – NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन तीन मेंढपाळ यांना उमरा येथील १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली असून याबाबत उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथील वन विभागाच्या जंगलात कापसी बु येथील दहा ते बारा मेंढपाळ हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी उमरा तांडा येथील उतम जाधव, हनमंत पवार, राजू उतम जाधव यांच्यासह बारा जणांनी उमरा खांडी येथील मेंढपाळ यांना या ठिकाणी मेंढ्या का चारवत आहात म्हणून वाद घातला त्यानंतर उतम जाधव, हनमंत पवार यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. या मारहाणीत गोविंद सिदने, मारोती गारपले यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गोविंद सिदने यांची बोटे फुटून हात मोडला ...
error: Content is protected !!