Deglur ; देगलूर काँग्रेसचा जनआक्रोश विराट मोर्चा; शेतकऱ्यांचा आक्रोश, अमर उपोषणाला सुरुवात
देगलूर l देगलूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती उद्ध्वस्त, घरं कोसळली, जनावरे दगावली तरीही शासनाकडून ठोस मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला सोमवारी उधाण आले. काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेल्या विराट जनआक्रोश मोर्चाने शहरात संतप्त वातावरण निर्माण केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करत चौकातून मार्गक्रमण करत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेकडोंच्या संख्येने शेतकरी व मजुरांचा सहभाग असल्याने संपूर्ण देगलूर शहरात दिवसभर उत्स्फूर्त वातावरण होते.
मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे पुढील ठोस मागण्या ...
