Prof. Manohar Dhonde : कै. बाळासाहेब ठाकरे व लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे माझे राजकीय नुकसान – प्रा मनोहर धोंडे -NNL
उस्माननगर, माणिक भिसे। गेली ३९ वर्षे मी एक निष्ठेने शिवसेनेचे काम केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला वारंवार न्याय देण्याचे काम केले परंतु कै.बाळासाहेब ठाकरे व लोक नेते कै. गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यामुळे माझे राजकीय नुकसान झाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी आज पर्यंत एक निष्ठेने राहिलो.
बाळासाहेब हे बाळासाहेबच होते त्यांनी कधीच जातीपातीचा विचार न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले त्यातच एक मी एक होतो. सध्याचे राजकारण हे जातीपातीचे झाले असून मी शिवा संघटना काढल्याने माझी जात कळाली त्यामुळे प्रस्थापित लोकांकडून मला राजकारणात खूप त्रास झाला आज कै.गोपीनाथ मुंडे, कै.बाळासाहेब ठाकरे असते तर मी कॅबिनेट मंत्री राहिलो असतो या दोघांच्या निधनाने माझे राजकीय खूप मोठे नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सेवा जनशक्ती पक्षाच...
