Kinwat Water Problems Meeting ; किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पैनगंगा नदी काटची 25 गावे पाण्या वाचून तहानलेली
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील पैनगंगा नदी काटच्या 25 गावात पाणीटंचाईने रौद्र स्वरूप धारण केले असून पैनगंगा नदीमध्ये ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूरावजी कोहळीकर यांनी पावले उचलावी अशा स्वरूपाची आता या दोन्ही मतदारसंघातून मागणी पुढे येत आहे. उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांनी एसडीओंच्या दालनात तातडीची बैठक उमरखेड येथे घेऊन तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात पैनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने नदी काठावरील गावांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनत चालला आहे .याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेण्यासाठी पाऊले उचलावीत अशा स्वरूपाच्या सक्त सूचना दिनांक 21 रोजी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिल्या.
मागील काही दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरण...
