हदगांव, शेख चांदपाशा| ज्येष्ठ साहित्यिक आनंद कदम यांनी साहित्यिकांनी समाज हित लक्षात घेऊनच साहित्य निर्मिती करावी, असे प्रतिपादन केले. नुकतेच मानवाडी येथे प्राचार्य डॉ. आ. वि. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली नववे अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आनंद कदम यांनी केले.


यावेळी स्वागताध्यक्ष आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्वागतपर भाषणात सर्व साहित्यिक, श्रोते अन्य मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक हभप गणपत पवार गुरुजी यांनी केले. सर्वांना दिवसभर चालणार्या कथा कथन, कवि संमेलन व परिसंवादात भाग घेण्याचे आवाहन केले.यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा. ऍड. शिवाजीराव माने, माजी खा. सुभाषराव वानखेडे, आ. किशनराव वानखेडे, माजी आमदार ऍड. गंगाधरराव पटणे, बालासाहेब पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कल्याणकर यांनी एकवीसाव्या शतकात झुंजवादाची गरीब व श्रीमंत नागरिकांना कशी गरज आहे. याचे प्रतिपादन केले.


प्राचार्य डॉ. वि. ना. कदम यांच्या अध्यक्षतेखाली शेतकर्यांची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादात डॉ. भगवान मनुरकर, पंजाबराव देशमुख हदगावकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. महिलांचे सक्षमीकरण व साहित्यितील त्यांचे योगदान या विषयावर परिसंवाद माजी सभापती सौ. लताताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रीयांना विकासामध्ये सहभागी करण्याचे आवाहन केले. या वेळी ऍड. माधवी जोशी यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी विविध कायद्यांची माहिती सांगितली. यावेळी साहित्य संमेलनात हभप सु.ग. चव्हाण यांचे हरिकीर्तन झाले.

उषा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. यात लक्ष्मण सुत, रेखा जगताप, मदन आंबोरे आदी कवींनी सहभाग घेतला. उत्तम मुधोळ तालनकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न झाले. समारोप प्रसंगी विविध ठराव घेऊन संमत करण्यात आले. या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सरपंच अमोल कदम, माजी उपसभापती बाबुशराव कदम, माजी पं.स. सदस्य किशोर कदम, निवृत्ती वानखेडे, कुबेर राठोड, दत्ताराव पवार, दिगंबर पवार, सुभाष पवार, राजकमलसिंघ गाडीवाले, संभाजी लांडगे, रामराव पवार, बी. पी. कपाटे, गणेशराव पवार, संजय पवार आदींनी परिश्रम घेतले.
