Inaugural speaker Anand Kadam : साहित्यिकांनी समाज हित लक्षात घेऊनच साहित्य निर्मिती करावयास हवी – उद्घाटक आनंद कदम
हदगांव, शेख चांदपाशा| ज्येष्ठ साहित्यिक आनंद कदम यांनी साहित्यिकांनी समाज हित लक्षात घेऊनच साहित्य निर्मिती करावी, असे प्रतिपादन केले. नुकतेच मानवाडी येथे प्राचार्य डॉ. आ. वि. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली नववे अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आनंद कदम यांनी केले.
यावेळी स्वागताध्यक्ष आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्वागतपर भाषणात सर्व साहित्यिक, श्रोते अन्य मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक हभप गणपत पवार गुरुजी यांनी केले. सर्वांना दिवसभर चालणार्या कथा कथन, कवि संमेलन व परिसंवादात भाग घेण्याचे आवाहन केले.यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा. ऍड. शिवाजीराव माने, माजी खा. सुभाषराव वानखेडे, आ. किशनराव वानखेडे, माजी आमदार ऍड. गंगाधरराव पटणे, बालासाहेब पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कल्याणकर यांनी एकवीसाव्या शतक...
