किनवट,परमेश्वर पेशवे। हुडी तलावाच्या मेन गेटमधून दिवसा काठी लाखो लिटर पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी केली आहे.

मराठवाडा गेल्या कित्येक महिन्यापासून मोठ्या पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र दोन दिवसापासून किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाटबंधारे उपविभाग किनवट अंतर्गत किनवट तालुक्यातील हुडी, कुपटी, मुरझळा, आप्पारापेठ, नंदगाव, जलधरा, सावरगाव, पिंपळी, अंबाडी, नागझरी, लोणी, वजरा, मांडवी, शिरपूर, वरसांगवी, पिंपळी,आणि डोंगरगाव असे बहुतांश लघू सिंचन तलाव,साठवण तलाव, आणि मध्यम प्रकल्प स्वरूपाचे तलाव एका रात्रीतच भरले गेले आहेत.

लघु पाटबंधारे विभागाच्या हूडी तलावाकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या तलावावर विविध जातीच्या झाडांची उगवण होऊन आज घडीला या तलावाला जंगलाचे स्वरूप आले आहे. त्याच बरोबर तलावाच्या मेन गेटमधून दिवसाकाठी लाखो लिटर पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात वीस ते पंचवीस गावाची तहान भागवणाऱ्या या हुडी तलावाच्या मेन गेट मधूनच लाखो लिटर दिवसाकाठी पाण्याची गळती होत आहे.


ऐन उन्हाळ्यात वीस ते पंचवीस गावाच्या पिण्याच्या पाण्यासह इतर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे संबंधित लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन दिवसाकाठी होणाऱ्या लाखो लिटर पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकरी नंदकुमार देशमुख, केशव कदम, देविदास घोगरे, शंकर कदम, शिवा मिराशे, सुभाष पाशिमवार, शेषेराव पोटे, सोमा देशमुख, किसन पोटे, नागोराव जाधव यांच्यासह इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी केली आहे.


