Monday, July 6

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

anger against smart meters : सगरोळी ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या १६ पथकांना पळवले – स्मार्ट मीटरविरोधात संताप

anger against smart meters : सगरोळी ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या १६ पथकांना पळवले – स्मार्ट मीटरविरोधात संताप

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड| सगरोळी गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. विज बिल कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार, कोणता मीटर वापरायचा याचा अधिकार ग्राहकाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील विद्युत विभागाकडून परवानगी शिवाय मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला. नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जास्त विजबिल येत असल्याने ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांशी बैठक झाली होती. यात अंदाजे बिल टाकणे, मीटर रीडिंगमध्ये अनियमितता आणि ग्राहकांकडून जादा वसुली होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही देखरेखीखाली दोन मीटर डेमो म्हणून बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच मीटर कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर बसवण्याचे ठरले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून लातूर, धाराशिव, बीड येथून आलेल्या १६ क्रुझर-बोलोरो गाड्यांतू...
Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळे अभियान उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी या मोहिमेत सहभागी होताना स्वतः महात्मा गांधी पुतळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनीही या मोहिमेत सहभागी होत ‘हर घर तिरंगा’ अभियान य...
Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत. वन विभागामार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे. या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत ...
Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती

Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती

हिंगोली, महाराष्ट्र
• जिल्ह्यातील आठ मुलींना उपलब्ध करुन दिली एक दिवस अधिकारी होण्याची संधी • मुलींनी मानले प्रशासनाचे आभार हिंगोली| जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर वाढविणे, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये जिद्द, प्रेरणा व नेतृत्व गुणांचा विकास तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय मुलींना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागीय वन अधिकारी या पदावर एक दिवस मानद अधिकारी होण्याची संधी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या प्रेरणेतून उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर वाढावे, बालविवाह निर्मूलन व महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उपाययोजनाचा एक भाग म्हणून रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुलींचा सन्मान होण्...
Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे “हर घर तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेवटचा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रत्येक घरावर, सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर, कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. त्या दृष्टिकोनातून संबंधित विभाग, कार्यालयांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते. “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विविध कार्यक...
Avoid misuse of alarm chain : अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर टाळा – नांदेड विभागाचा प्रवाशांना इशारा

Avoid misuse of alarm chain : अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर टाळा – नांदेड विभागाचा प्रवाशांना इशारा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) च्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जानेवारी ते जुलै 2025 या काळात 320 जणांवर कारवाई झाली असून, 103 दोषींवर यशस्वी दंडात्मक कारवाई करून ₹83,000 दंड वसूल करण्यात आला आहे. ACP चा गैरवापर केल्याने गाड्या अनावश्यक थांबतात, वक्तशीरपणा बिघडतो आणि प्रवाशांना गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, ACP फक्त अपघात, वैद्यकीय आणीबाणी, आग, सुरक्षा धोका किंवा अडचणीत असलेल्या दिव्यांग/वृद्ध प्रवाशांना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी वापरावा. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, ACP चा गैरवापर केल्यास 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा ₹1,000 पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि सुरक्षित, वेळेवर सेवा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले ...
Cycle yatra : आरोग्य संदेश सायकल यात्रा — ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमीचा प्रवास प्रत्येकासाठी आदर्श’ : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Cycle yatra : आरोग्य संदेश सायकल यात्रा — ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमीचा प्रवास प्रत्येकासाठी आदर्श’ : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| "सायकल हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून तो आरोग्याचे साधन, पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक दृष्ट्या शाश्वत पर्याय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात सायकल संस्कृती ही आरोग्य आणि शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड ते अयोध्या असा सायकल प्रवास करणाऱ्या पथकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमी’ या आरोग्य संदेश सायकल यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या यात्रेतून आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. नांदेड ते अयोध्या असा दीर्घ प्रवास करताना सायकलस्वार विविध गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणार आहेत. सायकलविषयी काही रोचक गोष्टी 1817 साली जर्मनीतील कार्ल व्हॉन ड्रायस यांनी पहिली दोन चाकांची "लॉफ मशीन" (Running Machine) तयार केली...
Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा 30 लाख रुपये निधी खर्च व खासदार एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव 30 लाख रुपये खर्च करण्यात आला नसल्यामुळे तसेच लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद यामध्ये दिव्यांगांसाठी कुठलेच प्रश्न उपस्थित करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने 15 जुन पासुन माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन सुरु करून लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेतले आहे. शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिनी आणि रक्षाबंधन दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाचा सहावा टप्पा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील मतीमंद शाळा तथा कार...
Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर /नांदेड| रामबाबू महाराज आदिवासी ग्रामीण विकास मंडळ वाळकेवाडीद्वारा संचलित मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळा ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुदान तत्वावर चालविली जाते. या शाळेचे संस्था चालक माधवराव वैद्य हे विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त असून, त्यांनी यापूर्वी या पदावर काम केलेले व विभागातील अनेक विद्यमान कार्यरत अधिकारी यापूर्वी वैद्य यांच्या अधिनस्त काम केलेले असल्याने शाळेतील बेकायदेशीर, नियमबाह्य कामाची पाठराखन करीत आहेत. आधीचे प्रभारी मुख्याध्यापक व सहशिक्षक गणपत दुधाडे यांचे अनेक महिण्याचे वेतन रोखले आहे. तक्रार केली असता, वरिष्ठ दखल घेण्यास तयार नाहीत. हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळेत संस्था चालकाने शैक्षणिक पात्रता व अर्हता नसताना देखील सहशिक्षक ...
Sahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो

Sahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर /नांदेड | विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैंगनगा नदीवर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पांला मंजुरी देण्याची मागणी हदगाव, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी विधानभनात केल्यानंतर बुडीत क्षेत्रात येणाऱ्या पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. जान देंगे जमिन नही देंगे हा नारा देत लोकप्रतिनिधीसह सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला असुन, रद्द झालेला प्रकल्प पुन्हा कुणाच्या हितासाठी उभा करीत आहात शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न सोडवायचा तर नदीवर बंधारे बांधा सात हजार कोटींचा प्रकल्प कशासाठी असा सवाल उपस्थित करत विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त महासभा सिरपल्ली येथे दिनांक 9 रोज शनिवारी संपन्न झाली आहे. सभेला जवळपास चाळीस गावचे हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ल...
error: Content is protected !!