Tuesday, May 19

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

flood victims : जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) तर्फे नांदेड येथे पूरग्रस्तांना 2000 राशन किटचे वाटप

flood victims : जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) तर्फे नांदेड येथे पूरग्रस्तांना 2000 राशन किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अलीकडील अतिवृष्टी आणि पूरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) नांदेड शाखेतर्फे आज ए.आर. गार्डन, मोजमपेठ येथे 2000 राशन किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पूरग्रस्तांच्या परिस्थितीवरील माहिती व मदतीच्या कार्यपद्धतीच्या विवेचनाने झाले. या वेळी विशेष अतिथी तहसीलदार संजय वर्कड आणि पुरवठा अधिकारी राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमीयत उलमा-ए-हिंद नांदेड जिल्हाध्यक्ष हाफिज अब्दुल हफीज यांनी भूषविले. कार्यक्रमास शहराध्यक्ष काजी मोहम्मद रफिक, हाफिज सलीम मिली, हाफिज जावेद, हाफिज ईसा, मौलाना सादिक इशाती, हाफिज अब्दुल जब्बार, हाफिज गाउस, मौलाना अनीस, हाफिज सईद, हाफिज अन्वर, मुफ्ती इजहाजुल हक कासमी, हाफिज अब्दुल कलीम, हाफिज खलील अहमद...
Vishnupuri ; शासकीय महाविघालय विष्णुपुरी येथील परिचारिका संघटनेच्या वतीने पुरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप

Vishnupuri ; शासकीय महाविघालय विष्णुपुरी येथील परिचारिका संघटनेच्या वतीने पुरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील परिचारिकांच्या वतीने परिचारिका संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या अन्नधान्य 200 किटचे वाटप सामाजिक बांधिलकी जोपासत केले असून या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षामध्ये घेता महाराष्ट्रातील काही भाग जसे कि, नांदेड परभणी लातूर सोलापूर बीड आदि भागामध्ये पूर परिस्थिती मुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पहावयाला मिळाले आहे. आपल्या सर्वांचा पोशिंदा आपला शेतकरी मात्र सर्व काही पूर परिस्थिती मध्ये गमावून बसला होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि घरात व तसेच शेतात पाणीच पाणी उरले होते हजारो हेक्टर जमीन पाण्या काही होती. घरा दारात पाणीच पाणी झाले होते, गुरे जाणवरे देखील पुरात वाहून गेल्याचे आपण सर्वांनी समाज माध्य...
Shiv Sena Shinde ; शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वसरणी येथील पुरग्रस्त बांधीत नागरीकांना अन्नदान किटचे वाटप

Shiv Sena Shinde ; शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वसरणी येथील पुरग्रस्त बांधीत नागरीकांना अन्नदान किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे यांनी पूरग्रस्त बांधीत वसरणी येथील पंचवटी व शंकरनगर भागातील नागरीकांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्य केले आहे. नावा मनपाच्या हद्दीत असलेल्या गोदावरी नंदीच्या पात्रालगत असलेल्या पंचवटी व शंकरनगर भागात गोदावरी नदी आलेल्या पुरामुळे पंचवटी व शंकरनगर भागातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने जिवनाशयक वस्तू सह संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,तर निवासस्थानी शिरलेले पाणी तिनं ते चार दिवस राहिल्याने नागरीकांना मनपाच्या वतीने राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व नांदेड दक्षिण जिल्हा प्रमु...
hunger strike in Kamarwadi : कामारवाडी येथील १५ वा वित्त आयोग निधी अपहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण

hunger strike in Kamarwadi : कामारवाडी येथील १५ वा वित्त आयोग निधी अपहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीच्या अपहार प्रकरणी चौकशी न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रामराव दशरथ मनमंदे यांनी सोमवार दिनांक 06 पासून हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास (hunger strike in Kamarwadi) सुरुवात केली आहे. मनमंदे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती हिमायतनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून कोणताही ठराव न घेता व ग्रामसभेची प्रक्रिया न करता श्रीशा इंटरप्राइजेस या नावाने रू. २,६३,२७२ इतका निधी उचलून अपहार केला आहे. या प्रकरणी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी ते आमरण उपोषणास बसले आहेत. प्रतिलिपी म्हणून तहसीलदार, तहसील कार्यालय हिमायतनगर तसेच पोलीस न...
Relief continues : पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

Relief continues : पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदतकार्य हाती घेत आहेत. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, विष्णुपुरी यांनीही या मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून धान्य किट उपलब्ध करून दिले. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे राहेगावला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क जवळपास दहा दिवस होता. या परिस्थितीत नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुनिश्चित केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने धान्य किटचे वितरण करण्यात आले. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजीही राहेगावात धान्य किट व...
Gram Panchayat Lakhmapur : लखमापूर येथील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम सूरू करा- अरविंद राठोड

Gram Panchayat Lakhmapur : लखमापूर येथील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम सूरू करा- अरविंद राठोड

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे ग्रा.प. लखनापूर ता. माहूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सदरील पाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम तात्काळ सुरु करून काम पूर्ण करवे व झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सदर कामाची चौकशी करून संबधित अभियंता व कंत्राटदार यांचे विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करवी अन्यथा नागरिकांच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल अशा अशयाचे निवेदन अरविंद नुरसिंग राठोड, अमोल लक्ष्मण राठोड यांनी गटविकास अधिकारी पस माहूर यांना दिले आहे. ग्रामपंचायत लखमापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरु करण्यात आले असून सदरील काम अद्याप पर्यंत अपूर्ण स्थितीत आहे. ज्यामध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम मे २०२५ सूरु केले परंतु सुरुवातीस क्युरिंग करण्यात आली नाही. विहिरीचे बांधकाम, गाव व तांड्यातील अंतर्गत पाईपलाईनचे काम, आदी कामे अपूर्ण आहे...
Mahaprasad : सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad : सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचे आयोजन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या वतीने भव्य संगीत रजनी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. श्रीजया अशोकराव चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने चारचाँद लागले. शुक्रवारी श्रीराम सेतु गोवर्धन घाट पुलाजवळ, डॉ. संतोष यादव यांच्या क्लिनिकसमोर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर दुपारी चार वाजता महाप्रसाद कार्यक्रमाची सुरुवात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीय, मुन्नासिंह तेहरा, व धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. भक्तांसाठी स्वादिष्ट मसाला चण्याचा महाप्रसाद रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाटप करण्यात आला. यादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी विविध दुर्गादेवी मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.सुरेश ...
Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल

Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल

नांदेड, सोशल वर्क
हदगांव l शहरातील बांधकाम कामगाराचे नविन ऑन लाईन व नुतनीकरण बांधकाम कामगाराच्या पात्र नोंदणी अर्जाला कोणती त्रुटी नसताना सुध्दा संबंधित बांधकाम कामगार मंडळा कडुन जाणुन बुजून त्रुटीमध्ये टाकत असल्याने दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे. बांधकाम कामगाराचे अर्ज वारंवार त्रुटीत काढल्याने तो अर्ज पुन्हा ऑन लाईन करुन दुस-या तारखेला हजर राहण्यासाठी कामगाराचे रोजगार बुडत आहे. व ऑन लाईन पुन्हा करण्यासाठी कामगारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बांधकाम कामगाराचे सं‍बंधित अधिकारी व कर्मचारी कोणतीही त्रुटी नसताना पात्र बांधकाम कामगाराच्या अर्जात जाणुन बुजून त्रुटीत काढत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या सर्व शासकिय योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. व तसेच कामगाराचे अर्ज पात्र होत नसल्याने त्यांना सुरक्षा सं...
Dr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर

Dr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर l जातीभेद, गरिबी-श्रीमंतीतील विषमता आणि स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आपली लेखणी झगडवणारे थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे हे शोषितांच्या वेदनेचे साक्षीदारच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक होते. त्यांनी माणसाच्या सन्मानाला आणि समतेच्या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून मानवी एकतेचा जागतिक संदेश दिला. आज देशाभिमानाच्या उदोउदोच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या या वैश्विक दृष्टिकोनाची, सर्वसमावेशक मानवतेच्या विचारांची, अधिकच आवश्यकता आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेत अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकर विषयक दृष्टिकोन या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाऊंच...
error: Content is protected !!