HomeकरियरAfter 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव...

After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात. कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर जावे लागते. पुन्हा कधीतरी ते शिक्षक, मित्र, मैत्रिणी भेटतील की नाही, याची शाश्वती पण नसतेः मात्र माहूर शहरातील श्री जगदंबा हायस्कूल च्या शाळेत १९९६/९७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २७ वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली आणि या अविस्मरणीय आणि भावनिकक्षणांचे साक्षीदार झालेत.
माहूर येथील कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात दि १५ मार्च रोजी या अनोख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सेवानिवृत्त प्राचार्य मराठीचे शिक्षक अरूण कोरटकर. यांनी या स्नेहसंमेलनाचे यथोचित उ‌द्घाटन केले.यावेळी बाबा गोडसे सर, अचकुलवार सर, राठोड सर, अशोक दवने सर, नागोरावजी गोडसे सर, बनारसे सर, मुनेश्वर मॅडम, वडस्कर मॅडम( सर्व सेवानिवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व उपस्थिती शिक्षकांचा शाल-श्रीफळ, हार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थिती शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून काही शालेय जिवनातून गमतीदार बाबींना उजाळा दिला. यावेळी विद्यादान करणाऱ्या सर्व गुरुजनांचे पूजन करण्यात आले.

या सोहळ्या करीता माजी विद्यार्थी अल्का कदम, नलीनी कदम, अल्फा पटेल, सत्वशिला शेळके, अरूणा बंडाळे, नितु पाटील, रेणुका फड, आदि मुलींची आपल्या सहपरिवारासह उपस्थिती होती , तर राजु राठोड, भुजंग राठोड, सचिन साबळे, अजय दिक्षीत, अजमद खान पठाण, विष्णु रेड्डी. श्रीपाद वाघ, विजय दुधे. सूशिल आमले (शिक्षक), डॉ.उदय भलगे एम डि, रितेश दुबे, रमेश आडे, विक्रम राठोड या सह जवळपास ६५ ते ७० विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते. अमोल भास्करवार, इमरान सुरैया, जगदिश वडस्कर, बालाजी वाघमारे, अनंता मुदगले, अतिष जयस्वाल, प्रशांत सुर्यवंशी, नागनाथ पवार, नबी साहब, लखन जाधव (शिक्षक), उमेश सावळकर आदिंनी हा कार्यक्रम घडवून आनण्या करीता मेहनत घेतली.

IMG 20250318 WA0007 After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !

एका वर्गात शिकण घेऊन आजरोजी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी परिचय देत विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करत जुन्या आठवणी ला उजाळा दिला.सोबत शिकलेले काही विद्यार्थी मित्र व शिक्षक मृत पावले त्यांना पसायदान घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गुरुजनांनी या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाचे कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार व्यक्त केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments