नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करत देशाच्या आर्थिक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला. शेतकरी, महिला, युवक, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक शिस्त यांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे चित्र समोर आले आहे.

शेतकऱ्यांसाठी काय घोषणा?
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
नारळ संशोधन केंद्राची स्थापना
पशुपालन व दुग्धव्यवसायासाठी अनुदानात वाढ
काजू, कोको ब्रँडला जागतिक दर्जा देण्याचा निर्णय
५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार
दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार
चंदन, नारळ व काजू पिकांना चालना
चंदन लागवडीस प्रोत्साहन
आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर
मत्स्यव्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार
सागरी किनारपट्टी व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मदत
शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी नवे पर्याय शोधणार
शेतीपूरक व्यवसायांना चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


सरकारचा खर्च आणि आर्थिक चित्र
सरकारला 26.7 लाख कोटी रुपयांचा कर अपेक्षित
एकूण खर्च : 49.6 लाख कोटी रुपये
भांडवली खर्च (कॅपेक्स) : 11 लाख कोटी रुपये
2026-27 मध्ये कर्ज तूट (Fiscal Deficit) : 36.5 लाख कोटी रुपये (अंदाज)
पुढील वर्षासाठी 53.5 लाख कोटी रुपयांच्या खर्चाची घोषणा
राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी बाजारातून कर्ज उभारणार
आर्थिक शिस्त राखत विकासाचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र दिसते.



🎓 शिक्षण आणि युवकांसाठी काय?
प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींचे वसतिगृह
मुंबईत एक्सलन्स सेंटर (Centre of Excellence) स्थापन
पशुवैद्यकीय व हॉस्पिटलसाठी आर्थिक सहाय्य
डिझाईन क्षेत्राला चालना
AI मिशन आणि R&D प्रकल्प सरकारकडून हाती घेणार
तरुणांसाठी आरोग्य, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व तंत्रज्ञानावर भर
भविष्यातील रोजगाराभिमुख शिक्षणावर अर्थसंकल्पाचा स्पष्ट फोकस.


हाय-स्पीड रेल्वे : 7 प्रस्तावित मार्ग
देशातील दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आले आहेत :
मुंबई – पुणे
पुणे – हैदराबाद
हैदराबाद – बेंगळुरू
हैदराबाद – चेन्नई
चेन्नई – बेंगळुरू
दिल्ली – वाराणसी
वाराणसी – सिलीगुडी
या प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार आणि रोजगाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा.

एकूणच बजेट 2026 हा शेतकरी, महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा अर्थसंकल्प ठरला आहे. आर्थिक शिस्त राखत विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

