नांदेड | केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दिल्ली येथून आगमन झाले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. स्वागतानंतर ही ग्रामगिता मी वाचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


