Wednesday, May 13

Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा…समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

हिमायतनगर| मानवाने जन्माला आल्यानंतर जिवनाचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पाईक होऊन समाज जागृती निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा आजच्या तरुणाईला लागलेली व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. याकरिता प्रत्येकांच्या गुरूंनी शिष्याकडे लक्ष दिले तर भविष्याची पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही एकदा आलेला जन्म पुन्हा येणार नाही हे डोक्यात ठेवून जगायला शिका असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाचे समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड यांनी केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावालगत असलेल्या मल्लीनाथ महादेव येथे गुरूपौर्णिमा निमित्ताने‌ हरी भजनाच्या कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

IMG 20250710 WA0064 Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा...समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

या दरम्यान व्यसनमुक्ती समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड महाराज म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पाईक होऊन आजच्या नवतरुण पिढीने ग्रामगीता, व्यसनमुक्ती, विमुक्त शेती, सेंद्रिय शेती,गायी पाळा, योगासन,ध्यान प्रार्थना यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातून समाज घडेल आणि भविष्यात नवतरुण पिढी व्यसनाधीनते पासुन दुर होईल.

यासाठी प्रत्येक गुरूंनी आजच्या पिढीला समाजप्रबोधन करण्याची गरज असल्याचे देशमवाड यांनी सांगितले यावेळी शेतकरी मारोती पाटील मोरे, दत्तराम कदम ,मारोती सुर्यवंशी, देवराव वाडेकर, माधवराव सुर्यवंशी, साहेबराव शिंदे, सुभाष गुंडेकर, प्रविण टोकलवाड यांच्यासह भजनी मंडळ उपस्थित होते गुरूपौर्णिमेच्या निमित्त पळसपुर येथील देवराव वाडेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!