Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Sri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी
धार्मिक नांदेड लेख January 12, 2026

Sri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 202623
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्री. गुरु तेग बहादूरजी हे शीख समुदायाचे गुरु होते, ज्यांची शहादत केवळ एका धर्म किंवा समुदायापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा एका आध्यात्मिक गुरूंनी अन्याय, अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीसमोर झुकण्याऐवजी आपले शीश अर्पण केले; मात्र आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण होणे साहजिकच आहे. नांदेड येथे होत असलेल्या 24 व 25 जानेवारी 2026 विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 

श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी केवळ शीख समुदायातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासातील एक महान विभूती आहेत. त्यांचे जीवन धैर्य, त्याग, करुणा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरु, गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे धाकटे पुत्र होते. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव गंभीर, शांत आणि आत्मचिंतनशील होता. इतर मुले खेळात रमलेली असताना गुरु तेग बहादूर साहिबजी एकांतात बसून ईश्वरचिंतन व साधनेत आनंद अनुभवत असत. त्यामुळेच पुढे त्यांचे जीवन बाह्य वैभवापेक्षा अंतःशक्ती आणि नैतिक दृढतेचे उदाहरण ठरले.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींनी बालपणी शस्त्र व शास्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. युद्धकौशल्य, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात त्यांनी प्रावीण्य मिळवले; मात्र कधीही हिंसा किंवा सत्तेच्या लालसेकडे त्यांचे मन वळले नाही. धर्म व मानवतेच्या रक्षणासाठीच शस्त्रांचा उपयोग अर्थपूर्ण असतो, हे ते जाणून होते. तरुणपणी त्यांनी दीर्घकाळ ध्यान व तपस्येचे जीवन स्वीकारले. त्यांच्या या वैराग्य व त्यागामुळेच त्यांना ‘त्याग मल’ असेही म्हटले गेले. हा त्याग संसारापासून पलायन नव्हता, तर अन्यायापुढे कधीही न झुकणारी आत्मशक्ती निर्माण करण्याचा मार्ग होता.

इसवी सन 1664 मध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शिखांचे नववे गुरु झाले. त्या काळात भारतातील सामाजिक व धार्मिक वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. तत्कालिन शासकाच्या धोरणांमुळे धार्मिक असहिष्णूता वाढत होती. अनेक ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतर, मंदिरांचा विध्वंस आणि धार्मिक आस्थांवर कठोर निर्बंध लादले जात होते. अशा परिस्थितीत श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे गुरु-पद स्वीकारणे ही केवळ आध्यात्मिक जबाबदारी नव्हे, तर एक मोठे ऐतिहासिक आव्हान होते.

गुरु तेग बहादूर साहिबजींनी आपल्या गुरु-कालावधीत व्यापक प्रवास केला. पंजाबपासून बंगाल, बिहार, आसाम तसेच पूर्व भारतातील अनेक भागांत त्यांनी भ्रमण केले. या यात्रांचा उद्देश केवळ शीख पंथाचा विस्तार नव्हता, तर लोकांमध्ये निर्भयता, आत्मसन्मान आणि ईश्वरावरील खरी श्रद्धा जागवणे हाच होता. ईश्वर एकच आहे आणि सर्व मानव समान आहेत, हे ते शिकवत. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन सत्य, करुणा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे, असा त्यांचा संदेश होता.

गुरु तेग बहादूरजींची वाणी अत्यंत गूढ व तात्त्विक आहे. त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये संकलित असून त्यामध्ये जीवनाची नश्वरता, मायेची असारता आणि ईश्वरभक्तीचा सखोल संदेश आढळतो. सुख-दुःख, मान-अपमान, भय-लोभ यापलीकडे जो जातो, तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे, असे ते सांगतात. आजही त्यांची वाणी माणसाला अंतःकरणाने मजबूत बनण्याची आणि बाह्य परिस्थितींनी विचलित न होण्याची प्रेरणा देते.

गुरु तेग बहादूरजींचे सर्वात महान व ऐतिहासिक योगदान म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान होय. काश्मीरमधील पंडितांवर जबरदस्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला जात होता. आपली श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती वाचवण्यासाठी ते व्याकुळ झाले होते. जेव्हा ते गुरु तेग बहादूर साहिबजींकडे गेले, तेव्हा गुरुजींनी ही वेदना केवळ एका समुदायाची समस्या मानली नाही, तर तिला संपूर्ण मानवतेच्या व धर्मस्वातंत्र्याच्या प्रश्नाशी जोडले.

कोणत्याही व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि कोणतीही सत्ता हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे श्री गुरु तेग बहादूरजींनी ठामपणे सांगितले. भीषण परिणामांची जाणीव असूनही त्यांनी काश्मिरी पंडितांच्या रक्षणाचा संकल्प केला. हा त्यांच्या जीवनातील सर्वात धैर्यशील आणि ऐतिहासिक निर्णय होता.

ही बाब तत्कालिन शासकांच्या दरबारापर्यंत पोहोचताच श्री गुरु तेग बहादूरजींना दिल्लीला बोलावण्यात आले. तत्कालिन शासकांचा धर्म स्वीकारल्यास त्यांचे प्राण वाचतील आणि मान-सन्मान व सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले. पर्यायाने चमत्कार दाखवण्याची मागणीही करण्यात आली. मात्र गुरुजींनी दोन्ही प्रस्ताव नाकारले. धर्मांतर म्हणजे आत्म्याशी द्रोह, तर चमत्कार दाखवणे म्हणजे ईश्वराच्या नावाचा अपमान, असे त्यांचे मत होते. जीवनाची किंमत मोजावी लागली तरी सत्य आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्धार केला.

इसवी सन 1675 मध्ये दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादूरजींना सार्वजनिकरीत्या शहीद करण्यात आले. त्यांच्या समोरच त्यांचे तीन परम शिष्य भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाल दास यांचा अमानुष छळ करण्यात आला, तरीही गुरु तेग बहादूरजी ठाम राहिले. त्यांनी मृत्यू स्वीकारला; पण आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. भारतीय इतिहासात धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले हे एक अद्वितीय व अनुपम बलिदान आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या शहादतीचा दूरगामी परिणाम झाला. या बलिदानाने हे स्पष्ट केले की भारताची आत्मा सहिष्णुता, विविधता आणि धार्मिक स्वातंत्र्यात दडलेली आहे. त्यांचे पुत्र गुरु गोबिंद सिंहजींनी या शहादतीतून प्रेरणा घेऊन खालसा पंथाची स्थापना केली आणि अन्याय, अत्याचार व असत्याविरुद्ध संघटित संघर्षाचा मार्ग खुला केला. अशा प्रकारे गुरु तेग बहादूरजींचा त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी धैर्य आणि आत्मसन्मानाचा शाश्वत स्रोत ठरला.

श्री गुरु तेग बहादूरजींचे जीवन हेही शिकवते की खरा धर्म केवळ आपल्या अनुयायांच्या रक्षणापुरता मर्यादित नसतो. त्यांनी आपले प्राण शीखांसाठी नव्हे, तर हिंदू पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. यामुळे ते संकुचित धार्मिक सीमांपलीकडे जाऊन एक सार्वत्रिक मानवतावादी व्यक्तिमत्त्व ठरतात. मानवता संकटात असताना खरे संत व महापुरुष वैयक्तिक हितांपेक्षा समाजाच्या हितासाठी उभे राहतात, त्यांचे जीवन हा सक्षम पुरावा होय.

आजच्या काळात, जेव्हा जगातील अनेक भागांत धार्मिक असहिष्णुता, हिंसा आणि द्वेष वाढत आहेत, तेव्हा श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचा संदेश अधिकच सुसंगत ठरतो. भीतीसमोर झुकणे सोपे असते; पण सत्यासाठी उभे राहणे हेच खरे धैर्य आहे, हे त्यांचे जीवन शिकवते. आत्मबल आणि नैतिक दृढता कोणत्याही सत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

इतिहास केवळ विजेत्यांनी नव्हे, तर सत्य, धर्म आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांनी घडतो, हाच संदेश गुरु तेग बहादूरजींचे जीवन व बलिदानातून आपल्याला मिळतो. अंधःकारातही मानवतेला प्रकाशाचा मार्ग दाखवला. धर्माचे रक्षण तलवारीने नव्हे, तर धैर्य, करुणा आणि सत्यनिष्ठेने होते, त्यामुळे श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे नाव भारतीय उपखंडात सदैव अमर दीपसारखे प्रज्ज्वलित राहील…

(डॉ. अमरजीत कौंके हे पंजाबी व हिंदी भाषेतील प्रख्यात लेखक असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.)संपर्क : 9814231698 पटियाला, पंजाब (गुरुद्वारा जन्मस्थान:  शिरोमणी संत नामदेव, नरसी नामदेव, हिंगोली यांच्या सौजन्याने)

Sri Guru Tegh Bahadur Sahibji The embodiment of sacrifice and renunciation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Magistrate : जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Next Article The door that awaits… वाट बघणारं दार….
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Godavari ghat ; चिंचोली शिवारातील गोदावरी घाटातून अवैध ‌ वाळू उपसा जोमात – NNL

November 11, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

August 17, 2024

Narendra Chapalgaonkar Dies : न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

January 25, 2025

Zilla Parishad Fake Transfers ; जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून कार्यवाही करा-माधवराव पा.देवसरकर

June 15, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय -NNL

Agriculture Department : कृषी विभागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहभोजन व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी लोकोपयोगी कामे करावेत – बालाजी बच्चेवार -NNL

Nanded bandh : जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?