Osmannagar ; उस्माननगर येथील पाणी टंचाई अद्याप हटेना….
उस्माननगर |उस्माननगर येथील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पाणी मिळावे. गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी या उदात हेतूने उस्माननगर शिराढोण व भुत्याचीवाडी अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना अंमलात आणली..,पण अनेक वर्षे होऊन ही उस्माननगर येथील पाणी टंचाई अद्याप हटेना.... अन् योजना असून पाणी कुठेच दिसेना...! अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
कंधार तालुक्यातील उस्माननगर गाव म्हणले की, येथील वीस पंचवीस वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. पाणी टंचाईचे गाव म्हणून मराठवाड्याला सुपरिचित असलेले गाव. या गावात मुलगी द्यायचे झाले , तर खुप विचार करावा लागत असे., नागरिकांना रात्र असो की दिवस अगोदर पाण्याची चिंता पडतं होती. सगे सोयरे आल्यावर सोयरा ज्यास्त दिवस राहत नसे. उस्माननगर येथे नागरिकांना तीन चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असे. कोसोदूर ची पायपीट करावी लागत असल्याने स्थानिक वृत्तमा...
