Children of Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पेरकेवार समाजाची मान उंचावली
हिमायतनगर | पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे वेळेवर लक्ष दिल्यास मुलगा-मुलगी शिक्षणात उत्तुंग भरारी घेऊन स्वतःसह आई-वडिलांचे नाव उज्वल करू शकतात, असे प्रतिपादन चेतना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका श्रीमती शकुंतलाबाई बाबाराव एबडवार यांनी केले.
जिल्ह्यातील सावळी येथील शेतकरी आबाराव संगनोड यांनी प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि अडचणींना तोंड देत आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यातून एक मुलगा नांदेड शहरात तज्ज्ञ डॉक्टर तर दुसरा मुलगा पुण्यासारख्या महानगरात स्वतःची कंपनी स्थापन करत आहे, ही बाब पेरकेवार समाजासाठी आदर्शवत व अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
आजही शेतकरी वर्गास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे हीच खरी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी आपल्या कर्त...
