CEO Meghna Kavali : स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा सीईओ मेघना कावली
नांदेड | गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही केवळ शासनाच्या योजनांमधून शक्य नसून त्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.
नांदेड येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता शिंदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, तसेच स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते.
म...
