MLA Baburao Kadam Kohlikar : खते बियाणांचा तुटवडा होऊ नये यासाठी आ. बाबूराव कदम कोहळीकरांनी आढावा बैठक घ्यावी
हदगांव, शेख चांदपाशा| महगाईचा वाढता प्रभाव लक्षात घेता काही दिवसावर आलेला खरिप हंगामात बियाणे व रासायनिक खतांचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली असून, यासाठी हदगाव विधान सभाक्षेत्रचे आ.बाबूराव कदम कोहळीकर.यांनी कृषि विभागाची आढवा बैठक घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत असतांना दिसून येत आहेत.
हदगाव तालुक्यात कडक उन्हाळा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरण बदलले असून, आता शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली आहे. येणार खरीप हंगाम फायदेशीर ठराव म्हणून शेतकरी उन्हात राब राब राबत आहे. तालूक्यातील शेतकऱ्यांना फक्त आता शेतीचा आधार उरलेला आहे. गत तीन ते चार वर्षांपासून पीकावर विविध रोग मुळे आवकाळी पाऊस शासनाचे पीक धोरण यामुळ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
तर अनेक शेतकरी वर्ग खरिपाच्या तयारीला लागले असून, खाते बियाणे खरेदीसाठी दुकानदारांचे उं...
