Islapur water supply ; इस्लापूर येथील जलजीवन योजनेचे काम अंतिम टप्प्यात; येत्या पंधरा दिवसांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हरघर जल ही योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून किनवट तालुक्यातील आती दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या इस्लापूर सारख्या ठिकाणी योजनेसाठी तब्बल 7 कोटी 67 लक्ष 86 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या महत्वकांक्षी योजनेची तांत्रिक मान्यता दिनांक 14 /10 /2022 रोजी मिळाली असून या योजनेचा कार्यारंभ आदेश 27/ 12 /2022 रोजी निघाला. या योजनेच्या माध्यमातून अप्रोच चॅनल ,आवक वीहिर जोडघर, वीहिर,जोडपूल यासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा निधी, अशुद्ध जलपंपिंग मशिनरी साठी 80 लक्ष 64 हजार रुपयांचा निधी, जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध जलपंपिंग मशिनरी ,पाण्याच्या उंच टाक्या ज्याची क्षमता 3 लक्ष 21 हजार लिटर उंची 12 मीटर दुसरी टाकी 1 लाख 7 हजार लिटर, या स्वरूपाची क्षमता असून या योजनेसाठी के...
