Bhagyalakshmi Bank ; जनतेला सर्वोत्तम ध्यास असल्याशिवाय राष्ट्राची उन्नती अशक्य : उदय निरगुडकर : भाग्यलक्ष्मी बँकेच्या २२ व्या व्याख्यानमालेची सांगता – NNL
नांदेड l व्यक्ती , समाज, संस्था, उद्योग, प्रशासन यांना सर्वोत्तमाचा ध्यास नसेल तर कोणत्याही राष्ट्राची प्रगती होत नाही. त्यामुळे जनतेने सर्वोत्तमाचा ध्यास ठेवून उन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण केल्यास स्वतः सह राष्ट्राचाही विकास होतो, भाग्यलक्ष्मी बँकेची वाटचालही तशीच चालू आहे. असे मत प्रतिद्ध आंतरराष्ट्रीय विचारवंत, सामाजिक राजकीय विश्लेषक, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. भाग्यलक्ष्मी बँकच्या २२ व्या व्याख्यानमालेत ते दुसरे पुष्प गुंफत होते .
खचाखच भरलेल्या कुसुम सभागृहात भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या २२व्या व्याख्यानमालेची रविवारी सांगता झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांची उपस्थिती होती. बँकेच्या अध्यक्षा सौ. सीमा अतनुरकर , उपाध्यक्षा सौ. रेखा मोरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा पराडकर यांचीही...
