Kedar patil salunke ; काँग्रेसने 4 वेळा मुख्यमंत्री दिलेल्या नांदेड जिल्ह्यांतील जनतेनी महायुती सरकारला दिलेल्या बहुमतांचा साधा मंत्री ही न देता अपमान केला – केदार पा. साळुंके -NNL
नांदेड। नांदेड जिल्ह्यांच्या आज पर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्याला अनेक वेळा मंत्री, चार वेळा मुख्यमंत्री तर; केंद्रीय गृहमंत्री अशा देशाच्या सर्वोच्च पदांवर संधी दिली असता त्याच जिल्ह्याने आज जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा भाजपा - महायुतीला दिल्या मात्र; साधे मंत्रीपदही दिले नसल्याने भाजप - महायुतीने नांदेडच्या जनतेचा अपमान केला असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस, श्री. केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत प्रत्येक वेळी जिल्ह्याला मंत्रीपद तर दिलेचं तर त्याहून अधिक चार वेळा मुख्यमंत्रीचं नव्हे; तर देशाचे सर्वोच्च केंद्रीय गृहमंत्री पदं ही दिलेलं आहे. मात्र; आज घडीला केंद्रामध्ये भाजपा - एन. डी. ए. चे सरकार आहे जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार आहेत, तर; महाराष्ट्रामध्ये देखील...
