MLA Bhimrao Keram ; सरसकट शेतकरी व बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने सानुगृह अनुदान मंजूर करावे – आ. भीमराव केराम – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| 31 ऑगस्ट पासून किनवट माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले तर वादळी वाऱ्यात अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकरी व बेगर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी किनवट व माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील चोवीस तासात 180 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन कापूस सोयाबीन ज्वारी तूर मूग उडीद अशा उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नदी व नाल्याकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकासह ...
