शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा -NNL
पणजी| आज सर्वत्रचे चित्र पाहिल्यास ‘थूक जिहाद’, ‘गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपापासूनचे पदार्थ, खवा, पेढा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. भाविक भक्तीभावाने देवाला ते अर्पण करतात. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवरील मोठा आघात आहे. आज अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिंदू दुकानदारांची प्रसादाची, पूजासाहित्यांची दुकाने असतात. त्यांच्याकडील प्रसाद आणि साहित्य शुद्ध अन् पवित्र असेल, असे सांगता येत नाही.
बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करणे चालू झाले आहे. हिंदु दुकानदारांना ‘ओम प्रमाणपत्र’ विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ अवश्य घ्यावे, अशी मी विनंती करत आहे, असे आवाहन तेलंगणा य...
