Dr. Rajendra Naikwade ; प्राचीन भारतीय अद्वैत तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार – डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांचे प्रतिपादन
नांदेड| "समरसता हे जीवनमूल्य आहे. भारतीयांचे अद्वैतचिंतन हे समरसतेचे अधिष्ठान आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार आहे", असे प्रतिपादन डॉ. प्रा. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. विसाव्या समरसता साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी रविवारी, दि. तीन ऑगस्ट रोजी बीज भाषण करताना ते बोलत होते.
येथील भक्ती लॉन्स येथे हे संमेलन चालू आहे. या प्रसंगी कै. गंगाधरदादा पवार व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव चं. कांबळे, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे.
सुमारे पाऊण तासाच्या बीज भाषणात प्रा. नाईकवाडे यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानापासून ते नव्वदोत्तरी साहित्यापर्यंतचा समर्पकपणे आढावा घेतला. समरसता हे जीवनमूल्य आहे. तसेच ते वा...
