Sandeep Malode : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – संदीप माळोदे – NNL
नांदेड| महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी 'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' ही थीम निश्चित केली आहे. या मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात १७ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. १८ सप्टेंबरला सुरक्षा मित्र शिबिर घेण्यात येणार असून, सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे लाभ देण्यात येईल. १९ सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात येणार आहे. २० सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्यांची लोकसभा...
