Congress : कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना नवीन वीज जोडणी तात्काळ द्या -संतोष आंबेकर
हिमायतनगर | वर्ष २०२३-२४ पासुन नांदेड जिल्ह्यातील हजारो अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहीरीचे खोदकाम व बांधकाम योग्य वेळेत केले. शासनाचा निधी मिळण्याच्या आधी त्यांना सर्व काम पूर्ण करावे लागले. गोरगरीब शेतकर्यांनी कर्ज घेऊन, उसने पैसे घेऊन, काही गहाण ठेऊन आणि काहींनी तर गुरेढोरे विकुन कसेबसे काम पूर्ण केले. त्यांची बिलं ही एका एका वर्षांनी मिळाली. त्यानंतर वीज जोडणी साठी अर्ज करून कोटेशन चा भरणा सुद्धा केला असताना जवळ जवळ दोन वर्षे होत आहेत.
मात्र अद्याप त्यां शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. उलट महावितरण कडून सौर ऊर्जा पॅनल बसवून घेण्याची सक्ती होत आहे. हा खुप मोठा अन्याय शेतकरी बांधवांवर होत आहे. असा आरोप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष संतोष आंबेकर यांनी केला आहे.
"मागेल त्याला सौर पंप योजन...
