महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL
भोकर, गंगाधर पडवळे। ओबीसी बचाव मेळावा भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेड मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या obc आरक्षणात मराठा समाज घुसखोरी करू पाहत आहे. आज पर्यंत सर्व सत्ता त्यांच्याच हाती आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत तेच सत्ताधारी असतानाही मराठा समाजाला ई डबल्यू एस, एस. बी. सि.यासारखे आरक्षण देऊनही आता दबावतंत्राचा वापर करून ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता आता सर्व ओबीसी नी एकत्र येऊन आपला माणूस कसा निवडून आणता येईल हेच ध्येय ठेवा असा सबुरीचा सल्ला दिला. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही.नाहीतर पुढीची पिढी तुम्हाला माफ करणार नाही असेही ठनकाहून सांगितलं.तर अशोक चव्हाण अंतरवेलीला अनेकदा पायघडी घालायला जातात पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील, मतदार संघातील ओबीसी च उपोषण ...
