Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan : प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात 15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड| प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यातील गावांमध्ये 15 ते 30 जून 2025 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील 128 गावे तर माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.
दिनांक...
