PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
नांदेड| पारंपरिक कारागिरीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून होत असून, कारागिरांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, जिल्हा उद्योग केंद्र व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७...
