Compensation should be given to the farmers ; अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -NNL
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याचे काठावरील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजितदादा गट अभिषेक लूटे यांनी एका निवेदनाद्वारे मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांनी म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यात आँगस्ट - सप्टेंबर -2024 मध्ये मुसळधार पाऊन होऊन शेतजमीन पाण्याखाली गेली व नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्याची जमीन खरडून गेली.
आहे.
हिमायतनगर तालुक्यात हिमायतनगर, सरसम व जवळगाव अशी तिन मंडळे असून, तिन्ही मंडळामध्ये खुप जाप्त प्रमाणात पाऊन झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्या...
