anger against smart meters : सगरोळी ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या १६ पथकांना पळवले – स्मार्ट मीटरविरोधात संताप
बिलोली/नांदेड| सगरोळी गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. विज बिल कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार, कोणता मीटर वापरायचा याचा अधिकार ग्राहकाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील विद्युत विभागाकडून परवानगी शिवाय मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जास्त विजबिल येत असल्याने ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांशी बैठक झाली होती. यात अंदाजे बिल टाकणे, मीटर रीडिंगमध्ये अनियमितता आणि ग्राहकांकडून जादा वसुली होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही देखरेखीखाली दोन मीटर डेमो म्हणून बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच मीटर कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर बसवण्याचे ठरले होते.
मात्र, याकडे दुर्लक्ष करून लातूर, धाराशिव, बीड येथून आलेल्या १६ क्रुझर-बोलोरो गाड्यांतू...
