Solve the problem : नाल्याच्या बाजुने होणाऱ्या दुर्गंधीत भराव टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा
हिमायतनगर| शहरातील शंकर नगर, बजरंग चौक, परिसरातील बांधण्यात आलेल्या नाल्याच्या बाजुने भराव टाकून नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी. अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी ते पळसपूर रोडपर्यंत नालीचे बांधकाम होऊन सहा महिने झाले असून, केवळ भराव टाकला गेला नसल्याने या भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे व दुर्गंधीयुक्त पाणी शिरत आहे. केवळ नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणामुळे घाण पाण्याने परिसरात डासांची व सांड अळ्यांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.
हि बाब लक्षात घेता तातडीने शंकर नगर, बजरंग चौक, परिसरातील बांधण्यात आलेल्या नाल्याच्या बाजुने भराव टाकून नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सुभाष...
