पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी – आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांना मागणी -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार। पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत पशुपालन व्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पशुपालन व दुग्धव्यसाय हा कृषीपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करणे आवश्यक झाले आहे. हि बाब लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाची रखडलेली पुनर्रचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी महसूल, पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती व उद्योजकतेद्वारे पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ करणे हे पशुसंवर्धन विभागाने उद्दिष्ट धेऊन विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन विभाग पुनर्रचनामुळे अधिकाधिक पशुपालकाभिमुख केला असून त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यां...
