नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह ; शैक्षणिक धोरणातील बदल ही काळाची गरज – प्रा. मोटेगावकर -NNL
नांदेड। मागील 40 वर्षापासून शैक्षणीक धोरणात कोणतेही बदल केले गेले नाहीत. तर शासन आता शैक्षणीक धोरणात आमूलाग्र बदल करु पाहतेय. आणि हा बदल झालाच पाहिजे, शासनाने सुरू केलेल्या नवं शैक्षणीक धोरण ही सध्या काळाची गरज आहे. असे मत नवं शैक्षणीक धोरणाबाबत प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केले.
या शैक्षणिक धोरणाबाबत अनेक पालक संभ्रमावस्थेत आहेत. आणि हे स्वाभाविक आहे. कारण हे नवं शैक्षणीक धोरण चांगले आहे की नाही. सरकार हे धोरण राबवून जे प्रयोग करते आहे. यामुळे आपल्या पाल्याचे भवितव्य धोक्यात तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न आज पालकांना या नवं शैक्षणीक धोरणाबाबत आहेत. याविषयी जागृती अभियान राबवून पालकांच्या शंकेचे निरसन केले गेले पाहिजे. कारण सरकार राबवीत असलेले हे नवं शैक्षणीक धोरण अत्यंत उत्तम आहे.
नवं शैक्षणीक धोरणात विद्यार्थ्याना आपल्या आवडीचे विषयांची निवड करून ध्येय ठरविता येते. अनेक ...
