Sant Namdev Maharaj : संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्र धर्माला उजाळा देण्याची गरज- ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड
नांदेड| समाजातील बंधुभाव, एकोपा, सलोखा घट्ट करण्यासाठी संत श्री नामदेव महाराज यांच्या कार्याला उजाळा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी येथे केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व नानक साई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत नामदेवजी महाराज: लौकिक व वाङ्मयीन योगदान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंग महाजन आदी उपस्थित होते.
डॉ. गायकवाड म्हणाले, ‘पंढरीच्या श्री विठ्ठलाचा समता, बंधुभावाच...
