Farmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे हैराण झालेल्या तालुक्यातील वाशी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होवून हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयावर सोमवारी धडक देऊन अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक पवित्र घेतला आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी पंपांला सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीचे निवेदन देऊन, शेतकऱ्यांच्या फोनला प्रतिसाद न देणाऱ्या अधिकारी व लाईनमन यांची उचलबांगडी करावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात आर्थिक संकटात आला आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून गहू, हरभरा, सूर्यफूल, करडई आदींसह विविध रब्बी पिकांची पे...
