शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL
नांदेड| युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले.
याच दिवसापासून त्यांनी राजपत्रावर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नामाभिधान सुरू केले आणि नवीन शक सुरू करत आपण युगप्रवर्तक शककर्ते आहोत, असे जाहीर केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे, ‘शिवराज्याभिषेक’. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असून, या निमित्ताने आम्ही शिवविचारांचा जागर मांडत आहोत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
