Water Leval Bottom ; इस्लापूर शहराला 15 ते 20 दिवसच पाणीसाठा पुरेल एवढाच पाणी साठा; सहस्त्रकुंडाणे गाठला तळ
किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर शहराला पंधरा ते वीस दिवसच पाणी साठा पुरेल एवढाच पाणी साठा सहस्रकुंड मध्ये असल्याने इस्लापूर वाशीयांना अखेर पाण्यासाठी वणवण भटकावं लागते की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येत आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी ही कोरडी पडल्याने या भागातील जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्याच अनुषंगाने पैनगंगा नदीवरील 15 ते 16 गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडावे यासाठी तब्बल सहा दिवस पैनगंगा नदी पात्रामध्ये आमरण उपोषण सुरू केले होते जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले.
मात्र अद्याप पर्यंत पैनगंगा नदी पात्रामध्ये इसापूर धरणाचे पाणी सहस्रकुंड पर्यंत आलेच नाही त्यामुळे अखेर सहस्त्रकुंडातील पाण्याने अखेर तळ गाठला आहे. याच कुंडातून इस्लापूर शहराला पाणी...
