Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL
नांदेड। संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी झालेला नागपूर करार तत्कालिन कॉंग्रेस अंतर्गत असला तरी तो मराठवाड्याच्या हिताचाच होता असे मत पीपल्स महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अभय दातार व्यक्त केले.
मराठवाडा जनता विकास परिषद, नागरी विकास कृती समिती आणि पीपल्स महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्यावतीने नागपूर कराराच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय दातार यांचे व्याख्यान आयोजित केेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजवीपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते. यावेळी बोलतांना डॉ.दातार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या दीड वर्षानंतर मोठ्या संघर्षातून हैद्राबाद संस्थान आणि मराठवाड्याचा भूभाग स्वतंत्र भारतात सामील झाला.
स्वातंत्र्यानंतर मराठवाडा हा आंधप्रदेशात सामील होता. हैद्राबाद राज्यातील मराठी भाषीकांना स्वतःचे राज्य असावे अशी अपेक्षा होती. हैद्राबाद...
