मुलींच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL
नांदेड| महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांची प्रेरणादायी काम हे आपणासाठी ऊर्जा असून गाव पातळीवर बालिका पंचायतच्या माध्यमातून गावागावात महिला सशक्तीकरणाचे पाऊल पुढे पडत आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या युवतींचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
नांदेड जिल्हा परिषद राबवत असलेल्या बालीका पंचायत या नाविन्यपूर्ण उपक्रमात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या बालीका पंचायत पुरस्कार सोहळा आज मंगळवार दिनांक 18 जून रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन झाला, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्...
