पावसाळ्याच्या तोंडावर पालीका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे होताहेत पाण्यासाठी बेहाल – NNL
कंधार, सचिन मोरे| गेल्या अनेक दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. परिणामी महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर पालीकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी बेहाल होत असुन, याविरोधात भारतीय जनता पार्टी कंधार शाखेच्या वतीने कंधार नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करत ऐड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी प्रतिकात्मक आंघोळ करत नगरपालिकेचा जाहीर निषेध केला आहे.
कंधार तालुक्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, एका बाजूस जगतुंग समुद्र व दुसऱ्या बाजूस मन्याड नदी आहे. शहरासाठी पाणीपुरवठा करन्या करिता २६ कोटी रुपयाची नळयोजना लिंबोटी धरणातून कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली होती, त्याचे काम अपूर्ण आहे. नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरीकानी पाणी पट्टी भरुन देखील वे...
