Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
नांदेड| पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम सन 2020 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
या अभियानात निसर्गातील पंचमहाभूतांवर भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यावर आधारित पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात येते. शासनाने निर्धारित केलेल्या टूलकिटमधील निर्देशांनुसार, ग्रामपंचायतींनी एप्रिल ते मार्च या कालावधीत विविध उपक्रम राबवायचे असून त्याची नोंद शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. त्यानंतर डेस्कटॉप व क्षेत्रीय मूल्यांकनाच्या आधारे उत्कृष्ट का...
