Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
नांदेड| ‘शरीराच्या जखमा दिसतात, त्यावर मलमपट्टी करता येते; पण मनाच्या जखमा अदृश्य असतात. त्या जखमांना शब्दांचे स्पर्श हवे असतात. व्यक्त होणे म्हणजेच मनाचे उपचार, आणि त्या उपचारांसाठी काव्य हेच सर्वांत प्रभावी माध्यम आहे, असे हृदयस्पर्शी प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. स्त्रीच्या वेदना केवळ शारीरिक नसतात, त्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावरही असतात, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.
त्या नांदेड येथे आयोजित कवयित्री नीलम नांदेडकर यांच्या ‘आनंदी चांदणे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. कार्यक्रमास सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. दि. भा.जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी तथा साहित्यिक, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. जीवन पिंपळवाडकर, तसेच साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. सभागृहात शब्दांचा आणि संवेदनांचा साक्षात उत्सव अवतरला हो...

