संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – NNL
पणजी| आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेनुसार निवडून येणारे जनतिनिधी हे संसदेत बसून देशातील जनतेच्या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्यांना भारताचे संविधान, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप असणारा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपावरून अटक असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे लोक देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडून आले आहेत. तर दुसरीकडे ‘गोव्यातील जनतेवर संविधान जबरदस्ती लादले गेले’, असे म्हणून गोमंतकाला मुक्त करण्यासाठी लढणार्या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस हे खासदार म्हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म...
