Wednesday, May 13

Tag: Hindu Janajagruti Samiti

Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, धार्मिक, नांदेड
पंढरपूर| प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ‘लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय’, असे म्हणत वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरपूर येथे विसावत आहेत. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसमवेत आळंदी येथे प्रस्तावित असलेला कत्तलखाना, वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्‍नांचा वाच...
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

देश विदेश, मुंबई
मुंबई| बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बांगलादेशाती...
‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Spiritual Alliance’ | ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Spiritual Alliance’ | ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

महाराष्ट्र
पंढरपूर| आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत, अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश पांढरे आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सिद्धता पहाण्यासाठी आणि आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथ...
हिंदूंच्या विरोधातील वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी अधिवक्त्यांची ‘इकोसिस्टिम’ आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक,  हिंदु जनजागृती समिती -NNL

हिंदूंच्या विरोधातील वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी अधिवक्त्यांची ‘इकोसिस्टिम’ आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती -NNL

Blog
गोवा| भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अधिवक्त्यांचे योगदान अतुलनीय आहे. लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लाजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास अशा अनेक अधिवक्त्यांनी त्या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न केले. अशाच प्रकारे हिंदू अधिवक्त्यांचे संघटन सक्रीय बनले, तर आगामी काळात हिंदु राष्ट्र्राची निश्चितच स्थापना होईल. आज विरोधकांकडून न्यायालयाच्या माध्यमातून वैचारिक युद्ध चालू केले गेले आहे, त्यामुळे हिंदूंची बाजू कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्यकता आहे. धर्मसंस्थापनेच्या या कार्यात योगदान देण्यासाठी हिंदु अधिवक्त्यांनी ‘इकोसिस्टिम’ उभी करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी ते ‘हिंदु राष्ट्राच्या ...
संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – NNL

संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – NNL

Blog
पणजी| आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेनुसार निवडून येणारे जनतिनिधी हे संसदेत बसून देशातील जनतेच्या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्यांना भारताचे संविधान, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप असणारा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपावरून अटक असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे लोक देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडून आले आहेत. तर दुसरीकडे ‘गोव्यातील जनतेवर संविधान जबरदस्ती लादले गेले’, असे म्हणून गोमंतकाला मुक्त करण्यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस हे खासदार म्हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म...
error: Content is protected !!