ग्रामसेवक,तलाठी,यांना मुख्यालयाची ॲलर्जी; माहूर तालुक्यातील नागरीकांची भटंकती -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक, तलाठी मुख्यालयी तर राहत नाही व पुसद, किनवट, नांदेड, यवतमाळ.येथून अप -डाउन करतात ह्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नागरीक त्रस्त झाले आहेत . ग्रामसेवक आणि तलाठयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी समनक जनता पार्टी ता.अध्यक्ष रवी राठोड यांनी केली आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा वाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी.विद्यार्थी.निराधार वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान कामासाठी शहर मुख्यालयी येवून तलाठी आणि ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागत आहे.
सध्या शेतकऱ्यांना क्रॉप लोन, घरकूल.तसेच विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिक, निराधार.ना काही दाखल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवक आणि तलाठ्याचा शोध घ्यावा लगत आहे. ग्रामी...
