Friday, May 15

Tag: Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal : भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण केलं, आता वोट चोरी करतायेत -हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण केलं, आता वोट चोरी करतायेत -हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीचे ढोल वाजत असताना रविवारी दुपारी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार शेख रफीक शेख मेहबूब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हदगांव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या साक्षीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते. शहरात आगमन होताच प्रदेशाध्यक्षांचे फटाक्यांच्या आतषबाजीने आणि घोषणाबाजीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि आता सोबत असणाऱ्यांनाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे ...
Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, राजकीय
A large public movement is being held against Hindi compulsion; the government will cancel the decision before the march मुंबई| हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. ५ तारखेला मोर्चा निघत आहे पण मार्चाच्या आधीच हा निर्णय रद्द करण्याची वेळ सरकारवर येईल मात्र हा मोर्चा काढून मराठी संवर्धनासाठी आपण कट्टीबद्ध आहोत हा संदेश देशात पोहचला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने आझाद मैदानात हिंदी भाषेच्या सक्तीव...
Immediately provide subsidy  : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

Immediately provide subsidy : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली ...
error: Content is protected !!